पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वसंत लाॅन्स व संगमनेरी तांडवच्या वतीने "वसंतोत्सव दही हंडी उत्सव"

इमेज
संगमनेर / अनंत पांगारकर येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी सक्रिय योगदान देणारे माजी नगरसेवक गोरख कुटे यांच्या 'वसंत लाॅन्स' व 'संगमनेरी तांडव' ढोलताशा यांच्यावतीने नगररोडवरील वसंत लाॅन्स येथे "वसंतोत्सव दही हंडी उत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेत तिरंगी फुगे सोडून हा आगळावेगळा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा व शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर संगमनेरी तांडव ढोलताशा पथकाने आपल्या जादुई वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.  यावेळी गोरख कुटे, सत्यजित तांबे व जयश्रीताई थोरात यांनी संगमनेरी ढोलताशा तांङवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याने या  कार्यकमाची उंची वाढत गेली. संगमनेरी तांडव या मंडळाचे  संस्थापक अध्यक्ष अभिजित दिड्डी व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर ढोलताशाचे वादन सादर केले. यावेळी...

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारपासून १६ दिवस प्रतिबंधात्मक आदेश

सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन अहमदनगर,  'नारळी पोर्णिमा' (रक्षाबंधन), 'श्रावण पोर्णिमा', 'अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी', 'स्वातंत्र्यदिन', "पारशी नूतनवर्ष', 'श्रीकृष्ण जयंती' 'गोपाळकाला', 'संत सेना महाराज पुण्यतिथी' व 'पोळा' हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार ११ ते २६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर शहर व जिल्ह्यात या सण व उत्सवा दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये...

पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो : बी.जी. शेखर पाटील

इमेज
बातम्यांच्या पलीकडील विश्‍व पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर  :  पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात. पण समाजातील बर्‍या-वाईट घटनांचा सखोेल शोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा खर्‍या अर्थाने विकास होत असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केले. विकसित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असते. पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचे काम करतो. समाजाचे विविध आजार बरा करणारा डॉक्टरचीही भूमिका पार पाडतो, असेही शेखर यांनी आवर्जून सांगितले. नगरमधील वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी लिहिलेल्या बातम्यांच्या पलीकडील विश्‍व या पत्रकारितेतील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (६ ऑगस्ट) सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात शेखर यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या चिनार पब्लिकेशन तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सौ. विद्युल्लता शेखर पाटील, केंद्र सरकारचे व...

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप

इमेज
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप संगमनेरच्या आश्वीमधील घटना संगमनेर | अनंत पांगारकर दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला नाही, या कारणावरून पत्नीच्या तोंडावर उशिने दाबून तिच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बांधून शॉक देत तिचा खून केल्याप्रकरणी पतीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर सासू आणि दिराची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. बाळासाहेब भिकाजी पिलगर वय 33 वर्ष असे पत्नीचा खून करणाऱ्या आणि याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 27 वर्षीय वर्षा बाळासाहेब पिलगर ही विवाहिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली. याची माहिती समजल्याने नवरा बाळासाहेब, दिर सुरेश सासू लिलाबाई यांनी संगणमताने तिने गर्भपात करावा असे सांगितले तिने ते ऐकले नाही, याचा राग मनात धरून आरोपींनी तिच्या नाका तोंडावर ऊशीने दाबत तसेच तिच्या हाताच्या तर्जनीला इलेक्ट्रिक वायर बांधून तिला शॉक देऊन जीवे ठार मारले. अशा आशयाची तक्रार वर्षा हिच्या वडिलांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.  30 जुलै 2016 रोजी ही घटना घडली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, लेखन...

संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश मोंढे

इमेज
संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश मोंढे  तर सेक्रेटरीपदी आनंद हासे यांची निवड संगमनेर (प्रतिनिधी) –  रोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी उद्योजक ऋषिकेश मोंढे, सचिवपदी उद्योजक आनंद हासे तर खजिनदारपदी विश्वनाथ मालाणी यांची निवड करण्यात आली. सन २०२२-२३ कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली असून रविवार दि. ७ ऑगष्ट रोजी बाफना हॉल, संगमनेर कॉलेज येथे सायंकाळी ५.३० वाजता पदग्रहण समारंभाचे नियोजन करण्यात आले आहे.  या वर्षाकरिता औरंगाबाद येथील रुक्मेश जखोटीया हे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे गव्हर्नर आहेत या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ईलेक्ट २०२३-२४ रो. स्वाती हेरकळ तसेच संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  १९८४ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब संगमनेर या संस्थेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यावर्षी क्लब ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील वर्षी कोविडमध्ये पती गमाविलेल्या महिला भगिनींना १११ कमर्शिअल आटा चक्की तसेच ६१ शिलाई मशीन क्लबमार्फत वाटण्यात आ...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील कारवाई विरोधात संगमनेरात निदर्शने

इमेज
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ई.डी.मार्फत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात संगमनेर शिवसेनेचे निदर्शने! संगमनेर शिवसेनेचे फायरब्रँड प्रवक्ते व भाजपा विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांच्यावर ई.डी.ने कारवाई करत त्यांना अटक केली असल्याच्या पार्शभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात आंदोलन व निदर्शने करण्यात आले. संगमनेर येथे झालेल्या आंदोलनात तीव्रपणे आपले मत व्यक्त करतांना खेवरे म्हणाले "महाविकास आघाडी सरकार घडवण्यासाठी विशेष भूमिका निभावलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा व केंद्रसरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, विरोधकांवर मुद्दाम खोटे आरोप करून केंद्रीय यंत्रणा हाताशी वापरून भाजपा देशभरात हे कृत्य करत आहे भविष्यात जनताच याला उत्तर देईल. या आधी देखिल भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रवेशा नंतर क्लीन चिट कशी मिळते हा देखिल विचार करण्याचा विषय आहे." असे आंदोलकांनी म्हटले आहे. संगमनेर बस स्थानक परिसरात झालेल्या आंदोलनात शिवसेना शहर...