पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोणत्याही कारणाने बिघडू शकते संगमनेरची कायदा व सुव्यवस्था

इमेज
संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना बजावल्या 149 च्या नोटिसा संगमनेर | अनंत पांगारकर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिस प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्या पोलिस प्रशासनाला येथील कायदा-सुव्यवस्था कोणत्याही किरकोळ घटनेमुळे बिघडू शकते याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सण-उत्सव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोंग्यामुळे पोलीस प्रशासनाने येथील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत. यदा कदाचित जर शहरात काही घडलेच तर याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल असा इशाराही पोलीस निरीक्षकांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदविले गेले आहे. धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या नोटिसा देणे हा पोलिसांचा नित्यक्रम असला तरीदेखील या वेळच्या या नोटिसाना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण गेल्या काही दिवसात पोलीस अधिकारी विरुद्ध संगमनेरकर असा संघर्ष येथे अनुभवण्यास मिळत आहे. विशेषता येथील बेकायदेशीर कत्त...

संगमनेरात शांतता समितीच्या बैठकीवेळी एसपी निर्णयाविना परतले

इमेज
  बैठकीकडे संगमनेरकरांनी फिरविली पाठ संगमनेर | अनंत पांगारकर महाराष्ट्र दिन रमजान ईद आणि अक्षय तृतीया या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बोलावलेली शांतता समितीची बैठक संगमनेरकरांनी पाठ फिरविल्याने बारगळली आहे. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठक न घेताच पुन्हा माघारी परतावे लागले आहे. यातून स्थानिक पोलीस प्रशासनाचे अपयश पुन्हा एकदा समोर आले. रमजान ईदच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या आदेशावरून पोलिस प्रशासनाने नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनातील सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीची निमंत्रणे देखील संबंधितांना देण्यात आली होती. मात्र सायंकाळी चार वाजता होणारी बैठक पाच वाजून गेले तरीदेखील सुरु होऊ शकली नाही. बैठकीसाठी आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बराच वेळ बसुन होते. मात्र काही निवडक व्यक्तींचा अपवाद वगळता बहुतांशी शांतता समितीशी निगडित सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. तब्बल तासाभराची वाट बघून देखील अवघ्या दोन नग...

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

इमेज
कोरोनाने पती मृत्यू झालेल्या एकल महिलांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांचा संवाद संगमनेर | अनंत पांगारकर  कोरोनाने पतीच्या मृत्युने एकल झालेल्या महिलांचे पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे‌ गरजेचे आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी येथे व्यक्त केले. संगमनेर येथील शासकीय वसतिगृहात  कोरोनाने मृत्यू झालेल्या एकल महिलांशी उपसभापती गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोरोना एकल समितीचे हेरंब कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे उपस्थित होते. या बैठकीला संगमनेर, अकोले, कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर या परिसरातील एकल महिलांसह प्रतिमा कुलकर्णी, कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता मालकर, शिवसेना महिला आघाडीच्या संगमनेर - अकोले तालुका संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, बारामती लोकसभा सहसंपर्क प्रमुख स्वाती ...

एमपीएससी परीक्षेत एकाच वेळी अमृतवाहिनीचे 27 विद्यार्थी

इमेज
  स्पर्धा परीक्षेत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची गौरवास्पद कामगिरी संगमनेर | अनंत पांगारकर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील सत्तावीस विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. असून यामुळे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे. डॉ. वेंकटेश म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नॅकचा 'अ' प्लस हा दर्जा मिळवला आहे. सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन, आधुनिक व हायटेक उच्च शिक्षणाच्या सुविधा याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी महाविद्यालय हे देशभरात लौकिकास्पद ठरले आहे. येथे सातत्याने संशोधनाला वाव दिला जात असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. यामुळे 2019 च्या एमपीएससी परीक्षेत या महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 27 विद्यार्थ्...

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

इमेज
वेल्हाळे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर पथकाकडून कारवाई संगमनेर : अनंत पांगारकर बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जण फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक 2 यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी  वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे. याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीर रित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-38, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-23, रा.जम्मू काश्मीर)  यांना अटक करण्यात आली आह...

किरीट सोमय्यावर हल्ला कराल तर दिसताक्षणी गोळ्या ?

इमेज
  मुंबई | सौ शहरी एक संगमनेरी विविध आरोपातून महा विकास आघाडी सरकारला जेरीस आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे.  माहितीनुसार त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला हल्लेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. सरकारने झेड सुरक्षा दिलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत जाब विचारला गेला. पहिला हल्ला त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झाला होता. त्यानंतर सोमय्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याला भेटण्यासाठी गेले असता मुंबईमध्ये खार पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला. त्यामुळे सीआयएसएफने या हल्ल्याची गंभीरतेने दखल घेतली आहे.  मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. शिवसैनिकांनी हल्ला केल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश देण्या...

योग्य नियोजनाने टँकरची संख्या घटली मात्र गरज असेल तेथे तातडीने टँकर द्या

इमेज
संगमनेर : प्रशासकीय भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रशासनाला आदेश संगमनेर काही वर्षांपूर्वी या तालुक्यात शंभराहून अधिक पाण्याचे टँकर सुरू होते, मात्र योग्य नियोजनामुळे आता ही संख्या अत्यल्प झाली आहे. यावर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे काही भागातून पाण्याच्या टँकरची मागणी येऊ शकते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने अशा ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. महसूल मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली येथील प्रशासकीय भवनात सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिलीच टंचाई आढावा बैठक झाली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, राजेश तिटमे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय फटांगरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे संगमनेर...

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य

इमेज
संगमनेर, प्रतिनिधी      सहोदया संगम चॅप्टरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. संगमनेरच्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यजमान अमृतवाहिनी आणि ध्रुव ग्लोबलच्या संघात अंतिम सामना रंगला होता, त्यात उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने यजमानांवर तब्बल सहा गडी राखून विजय मिळवला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे यजमानपद अमृतनगरच्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलकडे होते. स्पर्धेतील साखळी सामन्यात विजयाची श्रृंखला सुरु करणार्‍या धु्रव ग्लोबलच्या संघाने स्ट्रॉबेरी स्कूलच्या संघाचा 20 धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघासोबत झालेल्या उपांत्य लढतीतही ध्रुवच्या क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत उत्कृष्ट फलंदाजी करीत सात गडी राखून विजय मिळविला व अंतिम सामन्यात प्रवेश केला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूल विरुद्ध यजमान अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल अशी लढत रंगली होती. अंतिम सामना अतिशय चुरशीच...

महाविकास आघाडीचा भारनियमनाचा शॉक; प्रत्युत्तरादाखल भाजपचा कंदील आंदोलनाचा 'करंट'

इमेज
संगमनेरात भाजपाचे आंदोलन सौ शहरी एक संगमनेरी राज्यात महाविकास आघाडीने लादलेल्या महावितरणच्या भारनियमन विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने संगमनेर बस स्थानक चौकात आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी रात्री कंदील, मेनबत्ती आंदोलन करण्यात आले. देशात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना आणि रेल्वे मंत्रालय आवश्यक तेवढ्या वॅगन उपलब्ध करून देत असताना राज्य सरकारच्या नियोजनाअभावी राज्यावर आज भारनियमनाचे संकट ओढावले, लाईट बिलाची वसुली काटेकोरपणे सुरू असताना ग्राहकांकडून सिक्युरिटी डिपॉझीटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम नाही. २०१४ ते २०१९ या काळात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना राज्यात पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करून महाराष्ट्र भारनियमनमुक्त केले होते. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अंधारात लोटुन भारनियमन चालू केले आहे. मोठ्या प्रमा...

दुर्मिळ आणि दुग्धशर्करा योग : एकाचवेळी दोन महत्वाच्या आर्थिक संस्थांवर ‘सोमाणी’ बंधू ...

इमेज
अनंत पांगारकर | सौ शहरी एक संगमनेरी संगमनेरच्या अर्थकारणात एक महत्त्वपूर्ण दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. व्यावसायिकांसह समाजातील अनेक घटकांच्या उन्नतीला कारणीभूत ठरणाऱ्या दोन महत्त्वाच्या अर्थ संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा दोघा भावंडांवर सोपविली गेली आहे. कैलास आणि ओंकार सोमाणी हे दोघे भाऊ अनुक्रमे महेश नागरी आणि संगमनेर मर्चन्ट बँकेचा कारभार बघणार आहे. त्यामुळे संगमनेरच्या अर्थविश्वातील हा दुर्मिळ योग मानला जात आहे. महेश नागरी सहकारी पतसंस्था आणि संगमनेर मर्चन्ट बँकेसह संगमनेरच्या अर्थकारणात पतसंस्था आणि बँकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. स्वर्गीय उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी (भाऊ) आणि स्वर्गीय मोहनलालजी मनियार यांच्या पुढाकारातून अनुक्रमे महेश नागरी आणि संगमनेर मर्चंट बँक या संस्था उभ्या राहिल्या आहेत. संगमनेरातील अनेक घटकांच्या विशेषतः छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांच्या उन्नतीसाठी या संस्थांचा मोठा हातभार लागला आहे. या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक बळावर शहरातील अनेक व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू आहे. समाजातील विविध घटकांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या या संस्था आर...

महेश नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सीए कैलास सोमाणी

इमेज
उपाध्यक्षपदी योगेश रहातेकर संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेणार संगमनेर (अनंत पांगारकर) शहराच्या अर्थकारणाला नवा आयाम देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निष्णात अर्थतज्ज्ञ, लेखापरीक्षक कैलास सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच तरुण संचालक व उद्योजक योगेश रहातेकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. निवडीनंतर संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतांना नूतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवतांना संस्थेला शिखरावर नेण्याचा मनोदय व्यक्त केला. सहकार खात्याचे अधिकारी आर. एस. वाकचौरे यांच्या उपस्थितीत पुढील आर्थिक वर्षासाठी पदाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात सीए कैलास सोमाणी यांनी पुन्हा एकदा संस्थेचे नेतृत्त्व करावे, अशी इच्छा संचालक मंडळाने व्यक्त केली. त्यानुसार अनिल अट्टल यांनी सोमाणी यांच्या नावाची सूचना केली. तर विशाल नावंदर यांनी उपाध्यक्षपदासाठी योगेश रहातेकर यांच्या नावाची सूचना केली. त्याला संचालक मंडळाने एकमुखी पाठींबा दिला. शहराच्या अर्थकारणात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. महेश...

चाणक्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासला विकासाचा संगमनेर पॅटर्न

इमेज
अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांना भेटी संगमनेर देशातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पूर्व शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत चाणक्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विकास व सहकार अभ्यासण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याची निवड केली. या विद्यार्थ्यांनी येथील सहकाराबरोबर विकासाचा संगमनेर पॅटर्न अभ्यासला. पुणे येथील चाणक्य मंडळाच्या ५४ विद्यार्थ्यांनी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांना तसेच शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी कारखाना कार्यस्थळावर त्यांचे स्वागत थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजित थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. यावेळी समवेत संतोष हासे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, राजेश थिटमे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, शेतकी संघ, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, अमृतवाहिनी बँक, यशोधन कार्यालय, मार्केट कमिटी,...

परंपरा खंडित | वादाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाचे एक पाऊल मागे महिला उपनिरीक्षकाला मिळाला ध्वजाचा मान

इमेज
छायाचित्रे अण्णासाहेब काळे व काशिनाथ गोसावी सौ शहरी एक संगमनेरी श्रीराम भक्त हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अखेर एक पाऊल शनिवारी मागे घेतले. यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते रथावर मानाचा ध्वज लावण्याची परंपरा खंडित झाली असली तरी हा मान इतिहासात प्रथमच एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्या हस्ते पोलीस ठाण्यापासून मानाचा ध्वज मिरवणुकीने वाजत गाजत आणण्यात आला. महाले यांनी हा ध्वज हनुमान विजय रथावर लावला. त्यानंतर हनुमान रथाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. गोवंश हत्या आणि तस्करीमध्ये रक्ताने हात माखलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मानाचा ध्वज लावण्यापासून रोखण्याचा इशारा येथील विधिज्ञ श्रीराम गणपुले यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर मिरवणुकीत वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र जिल्हा पोलिस प्रशासनाने वाद टाळण्यासाठी आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना हा ध्वज घेऊन जाण्यास मनाई केली. त्यामुळे हा मान प्रथमच संगमनेरच्या रथ मिरवणुकीच्या ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीतासाठी बाबासाहेब सौदागर यांच्या गीताची निवड

इमेज
संगमनेर उदगीर येथे २२,२३ व २४एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या गीत लेखनासाठी श्रीरामपूरचे सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची निवड झाली आहे. या संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुखे आणि बसवराज पाटील नागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही निवड केली आहे. प्रथेप्रमाणे दरवर्षी मराठी भाषा गौरव आणि त्या प्रदेश वैभवाचे गीत ध्वनीमुद्रित करुन त्याची चित्रफित प्रदर्शित केले जाते. यावर्षी मान्यवर निमंत्रित कवी म्हणून आणि संमेलनाचे गीतकार म्हणून कवी बाबासाहेब सौदागर यांना हा सन्मान मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ते करणार आहेत. मराठवाड्यातील प्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. दुनियादारी चित्रपट फेम मराठवाड्यातील प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावर, विश्वास आंबेकर आणि शेफाली कुलकर्णी साकुरीकर यांनी आणि सहकारी यांनी हे गीत गायिले आहे. पुणे येथे कविवर्य गोपाळ अवटी, दिग्दर्शक विजय शिंदे चित्रपट कलाकार काळुराम ढोबळे यांच्या उपस्थितीत हे ध्वनीमुद्रण पार पडले. या...

डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला संगमनेरात गालबोट, दोघे अटकेत

इमेज
संगमनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी संगमनेरमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गुरुवारी रात्री गालबोट लागले. मेनरोडवर आलेल्या मिरवणुकीत काही मुस्लिम तरुणांनी धुडगूस घातला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सव्वाशेहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील अवघ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. डॉ आंबेडकर यांच्या जयंती दिनी संगमनेरमध्ये गुरुवारी सायंकाळी संघर्ष मंडळाने भव्य दिव्य मिरवणूक काढली होती. मिरवणूक रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मेन रोडवरील मुख्य मार्गावर श्रीकृष्ण मंदिरासमोर आल्यानंतर चांद तारा असलेला हिरवे आणि भगवे ध्वज हातात घेऊन जोरदार घोषणा देत मुस्लिम समाजातील तरुणांचा एक मोठा जमाव या मिरवणुकीमध्ये घुसला. या तरूणांच्या जमावाने मिरवणुकीत धुडगूस घालण्यास सुरुवात केली तसेच महिलांची छेडछाडदेखील केली. महिलांसोबत लज्जास्पद वर्तन करताना धक्काबुक्की, घोषणाबाजी, डॉ. आंबेडकर यांच्या रथासमोर विचित्र हावभाव करत त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अवमान केला. मिरवणुकीत घुसलेल्या तरूणांच्या जमावाने अल्ला हू अकबर, इस्लाम जिंदाबाद अशा घोषणा देत मिरवणुकीत बाधा आणण्याचा प्रयत...

विकासापेक्षा धर्माच्या नावावरिल राजकारण दुर्देवी : महसूल मंत्री थोरात

इमेज
वडगाव पान येथे संविधान संभाचे लोकार्पण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. निळवंडे कालव्याद्वारे ऑक्टोबरपर्यंत पाणी आणणार संगमनेर : सध्या देशभरात जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. विकासाच्या कामाऐवजी जाती-धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण पुढील काळासाठी दुर्दैवी आहे. जातीपातीचे राजकारण करून आपसात मनभेद निर्माण केले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. भिम प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्यातील वडगाव पान येथे संविधान स्तंभाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. वडगावपान-जोर्वे, काशीद वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, महानंद आणि संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सुनंदा जोर्वेकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. थोरात म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक विकासकामांना गती दिली आहे...

जिलेटिनच्या साह्याने शहरालगत एटीएम फोडले  एकोणवीस लाखाची रोकड लंपास

इमेज
जिलेटिनच्या साह्याने शहरालगत एटीएम फोडले  एकोणवीस लाखाची रोकड लंपास संगमनेर : संगमनेर शहरालगत आणि नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या अमृतवाहिनी महाविद्यालया समोरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवत फोडली आहे. चोरट्यांनी या एटीएममधील तब्बल एकोणवीस लाखाची रोकड घेऊन पोबारा केला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरापासून काही अंतरावर नासिक पुणे महामार्गालगत एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन आहे. हे मशीन जिलेटिनचा स्फोट करून फोडण्यात आले आहे. दरम्यान संगमनेर व परिसरात यापूर्वीदेखील एटीएम मशिन फोडण्याचा अनेक घटना घडल्या आहेत. या एटीएम फुटीचा आणि त्यातून चोरी गेलेल्या रकमेचा शोध लावण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर चोरटे आता मोठ्या रोकड रकमा असलेले एटीएम मशीन फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर करू लागले आहेत, हे मध्यरात्रीच्या घटनेतून समोर आले. अमृतवाहिनी महाविद्यालय ते संगमनेर बस स्थानक यादरम्यान सध्या चौपदरी रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. रस्त्याच्या कामासंदर्भात जिलेटिनचा वापर झाला असावा, असा समज झाल्याने नागरिकांनीदेखील याकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही. दरम्य...

मोबाईल वापरते म्हणून वडील रागावले; मुलीने केली आत्महत्या

इमेज
संगमनेर सतत मोबाईल वापरते या कारणावरून वडील रागावल्याने संतापलेल्या पंधरा वर्षीय मुलीने मुळा नदी पात्रात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. गुरुवारी सकाळी घारगाव येथे हा प्रकार समोर आला असून अक्षदा विकास वाघ (रा. आंबी खालसा, ता. संगमनेर) असे या मुलीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस यंत्रणेकडून मिळालेली माहिती अशी विकास वाघ हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पंधरा वर्षे वयाची मुलगी अक्षदा ही गावातील शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. मुलगी अक्षदा सतत मोबाईल मध्ये व्यस्त राहत असल्याने बुधवारी रात्री तिचे वडील तिच्यावर रागावले होते. याचा राग आल्याने ती रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. कुटुंबियासह नातेवाईकांनी रात्रभर या मुलीचा शोध घेतला मात्र ती कोठेही आढळून आली नाही. दरम्यान गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुळा नदीपात्रामध्ये पुलाखाली तिचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी घारगाव पोलिसांनी भेट देत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून हा मृतदेह शवविच्छेद...

लुटीचा बनाव केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

इमेज
  चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींसह पोलिस पथक चोरी गेलेली रक्कम तालुका पोलिसांनी १२ तासात केली हस्तगत संगमनेर : पाठीमागून आलेल्या दोन पल्सरवरील चौघांनी घाटामध्ये गाडी अडवत मारहाण करून ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविली. आणि दोन्ही पल्सर स्वार लोणीच्या दिशेने पसार झाले अशी आपबिती तक्रारदाराने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सांगितली आणि सारी पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी गुन्ह्याची एक- एक कडी उलगडत नेली आणि दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा दरोडेखोर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर स्वतः फिर्यादीच होता. सोहेल याकुब शेख (वय २९ वर्षे रा. एकता नगर' संगमनेर) असे या फिर्यादी दरोडेखोरांचे नाव आहे. त्याचे आणखी दोन साथीदारही या गुन्ह्यात निष्पन्न झाले असून समीर याकुब शेख (वय २४ वर्ष रा. एकता नगर, संगमनेर) व सैफअली शेरअली शेख (वय २५ वर्ष रा. नाईकवाडपुरा संगमनेर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघा आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांच्या रोकड रकमेसह पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनदेखिल ताब्यात घेतले आहे. आरो...

पोलीस निरीक्षक देशमुखांच्या संपत्तीच्या चौकशीची तक्रार लाचलुचपतकडे

इमेज
सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केली होती मागणी संगमनेर : संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अडचणीत सापडले आहेत. येथील गोवंश जनावरांची हत्या आणि बेकायदा सुरु असलेले कत्तलखाने यामुळे संगमनेरकरांच्या ‘रडार’वर सापडलेल्या निरीक्षक देशमुख यांनी पदाचा गैरवापर करुन कमविलेल्या संपत्तीच्या चौकशीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी थेट ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’चे दार ठोठावले आहे. त्यांनी पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर ती नाशिक विभागाचे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. खताळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, निरीक्षक देशमुख यांची नियुक्ती संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १३ नोव्हेंबर २०२० रोजी झाली असून त्या दिवसापासून त्यांचे वास्तव्य शहरातील नाशिक-पुणे मार्गावरील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या ‘पंचवटी’ या बड्या हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे किमान अडीच हजार रुपये एवढे आहे. आत्तापर्यतच्या पोलिस अधिकाऱ्यांचा रहीवास हा शासकीय निवासस्थानी, शहरातील भाड्याने घेतलेल्या स...

किरीट सोमय्यांविरोधात संगमनेरात शिवसेना रत्यावर

इमेज
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी   संगमनेर : आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात माजी सैनिकाच्या तक्रारीवरुन मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बसस्थानक चौकात आंदोलन केले. महाआघाडीच्या नेत्यांविरोधात मोहीम उघडणाऱ्या सोमय्यांविरोधातदेखील आता शिवसेनेत संताप व्यक्त होऊ लागला आहे. संगमनेरमध्ये झालेल्या आंदोलनात सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.                 सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत या लढाऊ जहाजाला भंगारात जाण्यापासून वाचविण्यासाठी व त्याची डागडुजी करण्यासाठी २०१३ ते २०१४ या काळात आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम उघडली होती. याकाळात त्यांनी अनेक विभागातील लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नांवाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले. लोकवर्गणीतून गोळा केलेली ही रक्कम जवळपास ५७ ते ५८ कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. हे पैसे त्यांनी राजभवनात जमा करणे अपेक्षि...

संगमनेरचा हनुमान जयंती उत्सव वादात सापडण्याची चिन्हे गोमांसाच्या आर्थिक व्यवहारात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखणार

इमेज
  सौ शहरी एक संगमनेरी संगमनेर  :  येत्या १६ एप्रिलला होणारा संगमनेरमधील हनुमान जयंती उत्सव वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .  हनुमान जयंतीच्या दिवशी संगमनेरमध्ये निघणाऱ्या रथाच्या मिरवणुकीला मोठी परंपरा आणि ऐतिहासीक महत्व आहे .  हनुमान विजय रथ ओढण्याचा मान महिलांकडे आहे .  मात्र तत्पुर्वी रथातील मुर्तीचे पूजन करण्याचा व रथावर झेंडा लावण्याचा मान पोलीस यंत्रणेकडे चालत आला आहे .  पोलीस बँडच्या निनादात सुरु होणाऱ्या या मिरवणुकीचा मान स्थानिक पोलीसांच्या चुकीच्या कृतीमुळे डावलला जाण्याची शक्यता आहे .  गोमांस तस्करीत आर्थिक लाभ घेणाऱ्या पोलीस यंत्रणेला रोखले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे .                  निष्ठा आणि प्रताप याचा आदर्श म्हणून देशभरात श्रीरामभक्त मारुतीची उपासणा केली केली .  संगमनेरसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे .  स्वातंत्रपूर्व काळात या मिरवणुकीला ब्रिटीशांनी सलग दोन वर्ष बंदी घातली .  दमनकारी ,  अनितीमान प्रशासनाविरोधात सामान्...